कुपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार पोलीस निरीक्षक अविनाश जगताप व उप अधीक्षक अशोक शिर्के यांनी केला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या विश्वासाहर्तेबाबत शंका निर्माण केल्याचे दिसून येत आहे. उप अधीक्षक अशोक शिर्के यांनी यापूर्वी केलेल्या सापळा कारवायांबाबत जिल्ह्यात दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून केवळ तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना गळाला अडकवून मोठे मासे सोडून देणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजून एखादी शासकीय यंत्रणा निर्माण करावी का, याबाबत शासनाने नक्की विचार करण्याची वेळ आली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!