Tanisha Bhise Death Case : पैसे नको पण दीनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि पुन्हा अशा घटना घेऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली आहे.
Sharad Pawar on Manmohan Singh : मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्या सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे होती. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी स्वतः ची 4 अपत्ये असताना त्यांची माहिती शासनाकडे लपवून ठेवेल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते तसेच युवा राज्य फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
समीर कच्छीसह 46 जणांवरील मोक्का कारवाईला मंजुरी मिळाली आहे. कच्छीवर कारवाई करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सरदार (सागर) भोगावकर यांनी मागील दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता.
एकास जातीवाचक शिवीगाळीसह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे फलटण तालुक्यातील मौजे विडणी येथील मांगोबा माळ येथे गेल्या १० महिन्यांपासून केंद्रीय जल जीवन मिशन या योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांची वीज चोरी सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
खटाव व वर्धनगड परिसरात उघड्यावर पडून असलेले जवळपास एक कोटी रूपयांचे मोबाईल टॉवरचे साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
आपल्या आसपास कुठेही अमानुष, अघोरी प्रथा, जादुटोण्याचे प्रकार अथवा नरबळीसारख्या गंभीर घटनांचा संशय आल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा नितीन उबाळे यांनी केले आहे.
येथील चरक आयुर्वेद दवाखान्यात समोरून अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून आतील 90 हजार रुपये किमतीच्या लॅपटॉपसह रोख रक्कम व कागदपत्रे चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
आनेवाडी गावच्या हद्दीतील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे वीस हजारांची चोरी केली आहे.
ठाकरे हे बोल घेवडे आहेत, त्यांच्यावर कोणी जादू केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पवारांच्या जो नादाला लागतो तो सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा जोरदार टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
बोलेरो जीपने पाठीमागून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोलोरो जीपवरील अज्ञात चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा शहरालगत महामार्गावर कंटेनरची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात विनोद बबन भोसले (वय 38, रा. तांबे रेवडे ता.कोरेगाव) हे ठार झाले.
अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डिजिटल युगात ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत असून त्यांचे ज्ञान असणारे सक्षम नेतृत्व करु शकतील असेच सरपंच, सदस्य असले पाहिजेत. गावच्या विकासासाठी लोकसहभाग श्रमदानाची स्वयंस्फूर्तीने साथ मिळत गेल्यास ग्रामपंचायतीच्या कामाचा लौकिक सर्वदूर पोहचेल, असा विश्वास पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी व्यक्त केला.
पादचार्यास धडकून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चारचाकी वाहनाची जाहीरात पाहून संपर्क करत ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर वाहन आणण्यासाठी गेल्यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे समोर आले. यावरुन डॉ. संदीप कोतवाल व नितीन धारपुरे (दोघे रा. पुणे) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कोणते मंत्री संत्री भ्रष्टाचार खंडणी संदर्भात काय बोलले मला माहित नाही. तुमच्यात हिंमत आहे, समोर येऊन आरोप करा. आपण दोघेही चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाऊ, असे थेट आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी अजितदादा पवार यांचे नाव न घेता दिले.
वरकुटे-मलवडी ता. माण येथे बांधण्यात आलेल्या तुटका खडा तलावातील अधिग्रहित जमिनीचा 8 कोटी रुपयांचा मोबदला न दिल्यास कृष्णानगर सातारा येथील जलसंधारण अधिकारी सतीश लब्बा यांना येत्या 27 जून रोजी गोमूत्राने अभिषेक घालण्यात येणार आहे. तरीही गांभीर्याने न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र् प्रदेश सरचिटणीस अभयशिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केवळ अक्षता टाकण्याच्या कारणावरून काल एका लग्नसोहळ्यात धुमश्चक्री उडाली. त्यातून वऱ्हाडी मंडळींना पोलिस ठाण्याची पायरी गाठावी लागली. पाटेश्वरनगर (ता. सातारा) येथे असलेल्या एका मंगल कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा जिल्ह्यातील ११ एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) चुकीच्या पद्धतीने टेंडर पद्धती राबविण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुट्टीच्या कोर्टासमोर तातडीची सुनावणी सोमवारी (दि.३०) पार पडली.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
कॉलनी फिल्म्स निर्मित व मूळचे वाईचे असणारे लेखक दिग्दर्शक निर्माता गणेश चव्हाण यांचा पहिलाच जिव्हारी नावाचा चित्रपट 20 मे रोजी येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याची माहिती चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली.
सातारा शहराजवळ असलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याला पुरातन इतिहास आहे, परंतु काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे व त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही, तरी हा किल्ला राज्यसंरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा
अस्तित्व लपवल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा गावच्या हद्दीत कणसे ढाब्यासमोर दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बोंद्री गावचे ग्रामदैवत श्री जानाईदेवी यात्रेनिमीत्त जानाई-भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब जाईचीवाडी (बोंद्री) यांच्या वतीने येथील तुळजाईसिटी मैदानावर दोन दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून आवसरी संघ जानाई-भैरवनाथ चषकाचा मानकरी ठरला.
दुष्काळी भागात वैभवशाली वास्तू उभ्या राहत आहेत. येथील मुले हुषार असून शैक्षणिक मेहनतीने देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावत आहे. तर काही जण सोन्याच्या दलाईचे काम करीत आहेत, असे प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
धोंडेवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत फाट्याजवळ अस्तित्व लपवल्याप्रकरणी वडुज पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला.
वीज मीटरमध्ये छेडछाड करुन त्याद्वारे वीज चोरी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील गोळी मैदान परिसरात असणाऱ्या पायरी पार्कमधील एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
केर, ता. पाटण येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या संतापजनक घटनेने पाटण तालुक्यातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या हलगर्जीपणा जबाबदार असेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कामथी, ता. कराड येथे किरकोळ कारणावरून महिलेस दोघांनी मारहाण केली. शनिवारी 15 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संगिता आनंदा पवार (वय 40) रा. कामथी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज याचे भव्य स्मारक वढू तुळापूर येथे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली त्याबद्दल त्यांचे स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल साजेसे असे करावे, याशिवाय शंभूपुत्र आणि संपूर्ण भारतभर मराठा साम्राज्याची पताका फडकविणारे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचेही भव्य स्मारक पुणे येथे शनिवारवाडा आणि साताऱ्यात संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
कार्वे, ता. कराड येथे चोरट्यांनी मेडीकल दुकानासह एका घरात डल्ला मारून सुमारे ५० हजाराचे साहित्य व ऐवज लंपास केला. बुधवारी २९ रोजी रात्री ही घटना घडली.
खटाव, ता. खटाव गावच्या हद्दीत अवैध वाळु तस्करांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून ६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी करण राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओमकार धनाजी पाटोळे, निलेश बाळु मदने, सर्व रा. खटाव, ता. खटाव यांना ताब्यात घेण्यात आले असून खटाव येथीलच गणेश उर्फ रजनीकांत शंकर शिंदे हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 34 लाख 68 हजार 898 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
चिमुकल्याचा मृत्यू प्रकरणी नगर अभियंता व उप अभियंता यांना तातडीने निलंबित करा व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ येथे प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे मानव कल्याणकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. सलीम पटेल व राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 12 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्यांनी या शिबिराचा लाभ घेतला असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
भाजपच्या समर्थ बुथ अभियानामध्ये सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण मंडलाने उत्कृष्ट काम केले. याबद्दल वाई येथे पार पडलेल्या भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कराड दक्षिण मंडल टीमचा सत्कार करण्यात आला.
कण्हेर, ता. सातारा येथील धरणातून वर उचलावयाचे सहा टक्के पाणी अडवून उताराच्या बंद पाईपलाईनने संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशातील केंद्र सरकारची अवस्था केविलवाणी असून त्यांनी भारतातील जनतेची अवस्थाही केविलवाणी करुन टाकली 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली ही एक प्रकारे जनतेची लूट असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील युवक मयूर बाळासो मुळीक (वय २९) याने गळफास घेवून आत्महत्या केली. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
चंद्रकांत देवरुखकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडले, समस्यांना वाचा फोडली तर अनेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीमत्वाचा प्रतापसिंह महाराज आदर्श पत्रकार पुरस्काराने झालेला गौरव सुवर्णकार समाजासाठी प्रेरक असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा पांचाळ सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सागर सागवेकर यांनी केले.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘बिग बी’ अमिताभ बच्चन वयाच्या ७९ व्या वर्षीही अफलातून अभिनय करताना दिसत आहेत. एका चित्रपटासाठी अमिताभ बच्चन सध्या कोट्यवधी रूपयांचे मानधन घेतात. मात्र, त्यांनी पहिल्या चित्रपटसाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का?
गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषात आणि सनईच्या स्वरात गुरुवारी पुन्हा एकदा दगडूशेठ गणपती मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. शासन आदेशानुसार घटस्थापनेच्या दिवशी मंदिरे खुली झाल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
रहिमतपूर आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असून सुद्धा आरोग्य सुविधांची वानवा पाहायला मिळत आहे. कारण, आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याने या आरोग्य केंद्राची जबाबदारी परिचारिका आणि कंपाउंडरवर पडत येत आहे. तसेच रात्री-अपरात्री जर एखादा पेशंट आरोग्य केंद्रात आला तर त्याची डॉक्टराविना गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराला रुग्ण वैतागले असून, 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध असावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.