ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कोण? या प्रश्नाचे उत्तर 1980 च्या दशकात कोणालाच ज्ञात नव्हते. आजच्यासारखी सोशल मिडिया, इंटरनेट नसल्याने देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकूनही खाशाबा जाधव हे नाव काळाच्या प्रवाहात लुप्त झाले होते. 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकपासून खाशाबांच्या नावाचा जयघोष हळूहळू दुमदुमू लागला. तो लेखक, पत्रकार व क्रीडा अभ्यासक प्रा. संजय दुधाणे यांच्या अथक प्रयासामुळे. 2001 मध्ये खाशाबा जाधव यांची केवळ चरित्रगाथा लिहून दुधाणे थांबले नाहीत, तर गेली 25 वर्ष खाशाबा हे नाव अजरामर होण्यासाठी झट तूनच आज 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. 15 रोजी त्यांच्या स्मृतीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
विजय दिवस चौकातील अमर जवान स्मृती स्तंभास बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गुरुवारी माजी सैनिक, पदाधिकारी, नागरीकांनी अभिवादन केले. दरम्यान, विजय दिवसानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.