येथील कृष्णा पुलावर उसाने भरलेल्या बैलगाडीला अचानक आग लागली. ही बाब इतर वाहन चालकांनी बैलगाडी चालकाच्या निदर्शनास आणली. त्यानंतर त्याने तात्काळ बैलांना बैलगाडीपासून वेगळे केल्याने अनर्थ टळला. बुधवार 16 रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेने काही काळ पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!