नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर 24 तास राहणार आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा वीज वितरण विभागाची अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी केले आहे.
राहत्या घरातील लाईटचा मीटर बदलण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या फलटण येथील प्रधान तंत्र कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कार्तिकस्वामी तुळशीराम गुरव (वय 45, रा. लक्ष्मी नगर कर्मचारी वसाहत, रोड क्रमांक आठ, फलटण. मूळ राहणार पिंगोरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!