माण-खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करावा. अन्यथा पुढील पंधरा दिवसानंतर सातारा जिल्ह्यात सर्वपक्षीय आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असूनही सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावे पाण्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील पाणी अनेक प्रकारे सांगली जिल्ह्यात जात आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व नेते पक्षीय मतभेद विसरून पाणी प्रश्नावर एकत्र येत असताना सातारा जिल्ह्यातील नेते एकत्र येत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी गावे अद्यापही वंचित आहेत.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!