dhumashchchakriinbridesontheoccasionofmarriage

esahas.com

लग्नातील अक्षतांवरून वऱ्हाडींमध्ये धुमश्‍‍चक्री...!!

केवळ अक्षता टाकण्याच्या कारणावरून काल एका लग्नसोहळ्यात धुमश्चक्री उडाली. त्यातून वऱ्हाडी मंडळींना पोलिस ठाण्याची पायरी गाठावी लागली. पाटेश्वरनगर (ता. सातारा) येथे असलेल्या एका मंगल कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.