एकीकडे कोरोना स्थितीने सर्वांना हैराण केले असतानाच गेल्या तब्बल चार महिन्यांपासून जलसंपदा सातारा येथील यांत्रिकी विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. यामुळे या सर्वांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून आमचे चार महिन्यांचे वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!