माण तालुक्यातील नरवणेसह दोरगेवाडी, काळेवाडी तसेच गटेवाडी परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, कांदा व मका आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!