काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सलग दोन ते तीन दिवसांपासून चौकशी होत आहे. या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारकडून ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीवतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!