सातारा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी ५ केंद्र व उपकेंद्र यांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!