बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदान (मुंबई) येथे गुरुवार 23 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची गारानी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकले नाही. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी २०२२ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!