balajijagdale

esahas.com

वडगावच्या माळरानावर युवा शेतकर्‍याने फुलवली आंब्याची बाग

आधुनिक काळात शिक्षणासोबतच शेतीचे महत्त्व सर्वांना समजले आहे. याचीच दखल आजचा तरुण घेत असल्याचे एक जिवंत उदाहरण माण तालुक्यातील वडगावच्या रानावर पाहायला मिळत आहे. सुमारे दहा एकर निव्वळ माळरानावर डोंगर हिरवागार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बालाजी जगदाळे यांनी केला आहे. त्यांनी  या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून 2700 झाडे लावली आहेत आणि ती पूर्णपणे जगवलेली सशक्तपणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.