autorickshawdriverharassedbytrafficpolice

esahas.com

वाहतूक पोलिसांच्या ‘दंड’गिरीने रिक्षाचालक हैराण

कोरोनाचा कहर संपल्यानंतर जगरहाटी सुरु झाली मात्र तोपर्यंत एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरु केलाय. त्यामुळे सातारा शहरात ग्रामीण भागातून येणारे तसेच बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असल्याने साताऱ्यातील रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस आलाय. मात्र, या स्थितीत देखील वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांना नो एन्ट्री तर कधी कोणत्याही कारणातून थेट 500 रुपयांचा दंड ऑनलार्इन त्यांच्या वाहनावर टाकला जात आहे.