संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात मंगळवारी आगमन झाले. पालखीचे साताऱ्यात आगमन होत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्त घाट येथे स्नान घालण्यात आले. नंतर पालखी लोणंदच्या बाजार तळाकडे रवाना झाली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!