खेड मंडलाधिकार्यांच्या मनमानी कारभाराला जिल्हा प्रशासनाने चाप लावण्याची गरज निर्माण झाली असून या भ्रष्ट अधिकार्याला पदमुक्त करुन तेथे एखाद्या प्रामाणिक अधिकार्याची नेमणूक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
येथील भारतीय स्टेट बँक, कराड ट्रेझरी शाखेत शेतकरी व पेन्शन धारकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी पेन्शन धारकांशी उद्धट वागत असून बँकेचे वाचमनही पेन्शन धारक व शेतकऱ्यांना ढकलून बाहेर काढतात. बँकेतील अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!