छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किंबहुना ज्यांच्या नावामुळे सातारा हे नाव पडले, त्या अजिंक्यतारा किल्ल्याची प्रतिकृती तयार करून मुस्लिम समाजातील बालगोपाळांनी खऱ्या अर्थाने सर्व धर्मीय समभावाचीच दिवाळी साजरी केली आहे.
सातारा जिल्ह्यात सुमारे 21 गडकिल्ले आहेत. तर काही किल्ले टेहळणी बुरुज म्हणून प्रसिद्ध आहेत. या गडकिल्यावर गडसंवर्धन संस्था काम करत असतात. प्रथमच सातारा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून आपले गडकिल्ले, आपली जबाबदारी ही मोहिम राबवण्यास मकर संक्रातीच्या सुदिनी किल्ले अजिंक्यताऱ्यावरुन प्रारंभ करण्यात आला.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते, आ. अजित पवार यांच्या पुतळ्याचा सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट करण्यात आला.
सातारा शहर परिसरात असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील कड्यावरून पडलेल्या व्यक्तीला जीवदान देण्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम आणि पोलिसांना यश मिळाले. हणमंत जाधव असे त्यांचे नाव असून ते १४ पेक्षा अधिक तास दरीत अडकून पडले होते.
नवी दिल्लीत भुपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग वाहतुक मंत्री ना. नितिन गडकरी यांची भेट घेतली आणि केंद्र शासनाच्या माध्यमातुन अजिंक्यतारा येथे उभारण्यात येणाऱ्या रोप वे बाबत विस्तृत चर्चा केली. लवकरच केंद्राच्या निधीतुन, नगरपरिषदेच्या मार्फत अजिंक्यतारा येथील रोप-वे च्या उभारणीस सुरुवात होईल.
आस्था बेघर निवारा केंद्रातर्फे वटपौर्णिमेच्या निमित्ताने अजिंक्यतारा पठार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सातारा तालुक्यातील राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहकार विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 21 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. कारखान्यासाठी 17 जुलै रोजी मतदान होणार असून 19 जुलैला मतमोजणी होणार आहे.
सातारा शहराजवळ असलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याला पुरातन इतिहास आहे, परंतु काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे व त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही, तरी हा किल्ला राज्यसंरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा
सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर सलग दुसऱ्या दिवशी समाजकंटकांनी वनवा लावल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यातील वणवा लावण्याची ही सलग सातवी घटना असून समाजकंटकांच्या तावडीतून किल्ल्याला वाचवण्याची मागणी सातारा शहरवासियांमधुन होत आहे.
किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गालगत गटाराचे काम निकृष्ट झाल्याचा भांडाफोड शिवसेनेने केला होता. या कामाची जबाबदारी सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. ते काम आम्ही केले नसल्याची माहिती संबंधितांनी दिल्याने या गटार बांधकामाच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे.
नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, या राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झालेला 'हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया' इफिशियन्सी पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे- पाटील, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. कारखाना उपपदार्थ निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, असा शब्द कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठया प्रमाणावर भासत होती. त्याकाळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावले.
ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे.