जावळी तालुक्यात आज पुन्हा दुसर्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले होते. अखेर दुपारी तीन वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये काढणीला आलेल्या भुईमूग, सोयाबीन, घेवडा आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!