मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्री चा उंबरठा ओलांडला नाही ते उध्दव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकट काळातील शेतकऱ्यांना किती मदत केली याचा हिशोब द्यावा अशी सणसणीत टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
'शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावं लागलं?' असा सवाल करतानाच 'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!