कोरोना काळात आपल्या सर्वांना एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
हल्लीची मुलं संवेदनशील नाहीत, भविष्याचा काही विचारच नाही, बघावं तेव्हा मोबाईल, मोबाईल आणि मोबाईलच.. त्यापलीकडे त्यांना काही दिसत नाही, अशा अनेक तक्रारी अलीकडच्या कुमारवयीन मुलांविषयी ऐकायला मिळतात. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे तर मुलांच्या शिक्षणापासून, त्यांचे छंद, मैत्री, मैदानी खेळ, मनोरंजन आदी सवयी या बाबींवरही परिणाम झाल्याचे सतत ऐकायला व पाहायला मिळत आहे. मात्र, पुसेगाव सारख्या ग्रामीण भागात अशा बिकट प्रसंगातही काही मुलं संधी शोधून आपापल्या आवडी, निवडी, छंदाला जोपासताना दिसत आहेत. कोरोनाच्य
‘नगरपालिकेची जागा नसताना विकासकामांच्या नावाखाली त्या जागेवर आमदार फंड टाकला जात असून, हा प्रकार खपवून घेणार नाही. या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्या ठिकाणी आमदार फंड टाकल्यास आम्ही जिल्हाधिकार्यांकडे 308 अन्वये तक्रार करणार असून, सत्ताधारी राजे गटाकडून कोरोना काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे,’ असा गंभीर आरोप फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.
‘सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सेवाभावी वृत्तीने देखभाल करणार्या कर्मचार्याचे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन सिद्धेश्वर पुस्तके यांनी व्यक्त केले.