maheshpawaryaanchimirachinews

esahas.com

अवघ्या 36 गुंठ्यात मिरची लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटाव तालुक्यातील वडूज लगत असलेल्या शेतात  येथील युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांनी 36 गुंठ्यात मिरचीच्या लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत 5 लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे. खर्च वजा जाता पाचव्या तोड्यातच 5 लाख  रुपयांचे उत्पन्न मिळाले तर अजूनही 5 ते सहा लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी बबलू पवार यांनी व्यक्त केली आहे.